पुरंदर रिपोर्टर Live
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सालपे गावात ३० जून २०२५ रोजी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. विहिरीत पडून आई आणि सात वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती लोणंद पोलिसांनी दिली आहे.
या घटनेत सौ. माधुरी लक्ष्मण कचरे (वय २८) आणि त्यांचा मुलगा शंभुराज लक्ष्मण कचरे (वय ७) यांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मौजे सालपे गावाच्या हद्दीतील कोळेकर वस्तीशेजारी असलेल्या ‘पंधरकी’ नावाच्या शिवारात घडली.
या घटनेची माहिती माधुरी कचरे यांचे नातेवाईक दादा यशवंत कचरे (वय ३७, व्यवसाय शेळी-बकरी पालन, रा. सालपे) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली.
प्राथमिक तपास पोलीस नाईक मदने (ब.नं. ११५१) करीत असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अकस्मात मृत्यू म्हणून नोंदविण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments