पुरंदर रिपोर्टर Live
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर व शिर्डी विमानतळांची आढावा बैठक गुरुवारीझाली. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) २०१९ च्या पुनर्वसनधोरणानुसार पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हीभूसंपादन प्रक्रिया पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचनामुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
पुरंदर विमानतळासाठी सात गावांमधील सुमारे २ हजार ८०० एकर जमिनीची आवश्यकता आहे. यातीलबऱ्याच गावांमध्ये विमानतळालाच विरोध केला जात आहे. मात्र, मध्यंतरी झालेल्या सुनावणीदरम्यानबऱ्याच शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी संमती देताना त्यासाठीचे पॅकेज लवकर जाहीर केले जावे, अशीमागणी केली होती. शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन ‘एमआयडीसी’ कायद्यानुसारच भूसंपादनकरण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे या सात गावांतील शेतकऱ्यांना आता जमिनीसाठीनुकसान भरपाईसोबतच त्यांच्या संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या दहा टक्के परतावा जमिनीच्यास्वरूपात मिळणार आहे. औद्योगिक/व्यावसायिक/निवासी किंवा संमिश्र प्रयोजनासाठी औद्योगिक क्षेत्रातही जमीन त्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्रऔद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा स्वाती पांडे, मुख्य वित्त अधिकारी अनिशा गोदानीआदी उपस्थित होते.
या ७ गावांत भूसंपादन…
वनपुरी, उदाची वाडी, एकतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, पारगाव आणि खानवाडी
२,८३२ हेक्टर -पुरंदर विमानतळासाठी आवश्यक जमीन.
काय फायदा होणार ?
एमआयडीसी पुनर्वसन धोरणानुसार जमीन संपादन करण्यास संमती देणाऱ्यांना प्राधान्याने चौपटमोबदला
प्रकल्पबाधितांकडून वाटाघाटीने मंजूर झालेल्या दराने जमिनीचे संपादन करण्यात येते.
प्रकल्पबाधितांना एकूण मोबदल्यापैकी १० टक्के जमीन परतावा दिला जाणार सर्व बाधितांना आवश्यकतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असून नोकरी वव्यवसाय प्रशिक्षण मिळणार.
मोठ्या विमानांसाठी सोय करण्याची उपमुख्यमंत्र्यांची सूचना…
पुरंदर विमानतळासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विमानतळासाठी लागणारीजमीन संपादित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुरू करावी; जेणेकरून विमानतळाचे काम लवकर सुरू होईल, असे फडणवीस म्हणाले. पुरंदर विमानतळावर मोठीविमाने उतरण्यासाठी आतापासूनच आवश्यक ती काळजी घ्यावी. या विमानतळावर विमानांच्याहँगरचीही व्यवस्था असावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करावी; जेणेकरून विमानतळाचेकाम लवकर सुरू होईल. हा विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्रातील विमानसेवा अधिक सक्षमहोईल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

0 Comments